लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 25 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ’मतसंग्रामा’ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.
नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.
| भाकित/अंदाज | निकाल | निष्कर्ष |
| 1 नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही | चूक | |
| 2 कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही | भाजप 282 | चूक |
| 3 काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही | युती 334+ | चूक |
| 4 भाजपला 155 ते 165 जागा | 282 जागा | चूक |
| 5 काँग्रेसला 115 ते 126 जागा | 44 जागा | चूक |
| 6 राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा | 6 जागा | चूक |
| 7 शिवसेनेला 10 ते 12 जागा | 18 जागा | चूक |
| 8 समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा | 5 जागा | चूक |
| 9 बसपाला 16 ते 18 जागा | 0 जागा | चूक |
| 10 महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूक | चूक | |
| 11 आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही | बरोबर | |
| 12 नरेंद्र मोदी वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल. | बरोबर | |
| 13 वाराणसीत त्यांना ’आप’च्या अरविंद केजरीवालयांची कडवी लढत मिळेल | मतातील फरक 371784 | चूक |
| 14 एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही | बरोबर | |
| 15 पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे मतातील फरक यांच्यात अटीतटीची लढत | मतातील फरक 315769 | चूक |
| 16 विश्वजित कदम यांची सरशी होणार | चूक | |
| 17 मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील सर्व जागा युतीला | चूक | |
| 18 मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणार बारणे विजयी | चूक | |
| 19 शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत | बरोबर | |
| 20 नितीन गडकरींना नागपूर मध्ये केवळ पाच ते दहा हजार मतांनी विजय मिळेल. | मतातील फरक 284828 | चूक |
| 21 येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार | वाट पाहू या | |
| 22 त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल | वाट पाहू या |
भाकित 21 व 22 साठी वाट पहावी लागेल. परंतु उरलेल्या 20 भाकितांपैकी केवळ 4 भाकितं बरोबर ठरल्या. वरील आकडेवारीवरून निष्कर्ष काढल्यास फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांची ऐशी तैशी झाली असेच म्हणावे लागेल.
श्री नंदकिशोर जकातदार एक पत्रकार परिषद घेऊन आपण चुकलो किंवा फलजोतिषाचे अंदाज चुकू शकतात अशी जाहीरपणे प्रांजळ कबूली देतील का?
सुज्ञास जास्त सांगणे न लगे!
सर्व आकडेवारींचा संदर्भः http://eciresults.nic.in/statewiseS13.htm?st=S13
–प्रभाकर नानावटी
लेखक संपर्क : 9503334895