Categories
अभियान

कायद्याच्या प्रचारासाठी विद्यार्थी भारतीचे पथनाट्य

जानेवारी - २०१४

विद्यार्थी भारतीची “कोण म्हणतं दाभोलकर गेले” या पथनाट्याच्या 100 व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विद्यार्थी भारती संघटनेने वर्धापनदिनानिमित्त सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून पथनाट्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला आणि आता 100 वा यशस्वी प्रयोग करून या मोहिमेची सांगता छबिलदास शाळा सभागृहात झाली. समाजात जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग केला.

या नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने मुंबईचा स्टेशन परिसर, वस्त्या व सफाळा, पालघर, मनोर या ठिकाणी सुद्धा करण्यात आले तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कायद्याला पाठींबा देण्यासाठी विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्य करून संपूर्ण नागपूर पिंजून काढले. अंधश्रद्धेच्या नावावर बाबा-बुवांचे वाढते अत्याचार, सामान्य जनतेची होणारी फसवणूक अशा गोष्टींना आळा बसून विवेकवाचा प्रसार होण्यासाठी विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्षा पूजा बडेकर व त्यांचे खालील साथीदार यांचे मन:पूर्वक आभार!

किशोर जगताप, राहुल घरत, विजेता भोनकर, स्मिता साळुंखे, विराज मेहेर, मंजिरी धुरी, संतोष गायकवाड, स्वप्नील तारे, प्रजोत अडसूळ, ज्योती निकाळजे, निखील घरात, राकेश सुतार, मेघा धुरी, स्वप्नील धोणे.