Categories
अभिवादन

उच्चवर्णियात व्होल्टेअर का निर्माण झाला नाही?

एप्रिल - २०१५

उच्चवर्णियात व्होल्टेअर का निर्माण झाला नाही? आज तरी सगळी विद्वत्ता उच्चवर्णीयाकडे राहिली आहे. तथापि व्होल्टेअरची भूमिका घेण्यासाठी एक देखील उच्चवर्णीय पुढे सरसावला नाही. व्होल्टेअरपाशी बुद्धीचा प्रामाणिकपणा होता. तो स्वत: ज्या कॅथॉलिक चर्चमध्ये वाढला, त्या चर्चच्या तत्वप्रणालीविरूद्ध त्याने आपला संघर्ष उभा केला. असा व्होल्टेअर इथल्या तथाकथित ज्ञानाच्या ठेकेदारांत भविष्यकाळातही उमटण्याची चिन्हे दिसत नाहीत. तुर्कस्तानच्या सुलतानने मुस्लिम […]

Categories
जात पंचायत

वैदु जातपंचायत रद्द : अंनिसच्या लढ्याचे मोठे यश

एप्रिल - २०१५

दि.15/03/2015 रोजी वैदू समाज बांधवांनी महाराष्ट्रातील वैदू समाज जात पंचायत रद्द केल्याची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. वैदू समाज जातपंचायती विरूद्धच्या सतत दीड वर्षेदिलेल्या लढ्यात आलेले यश आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंददायी असले तरीही हा निर्णय झालेनंतर मनात हूरहूर वाटत होती. हा आनंद द्विगुणित करायला, चळवळीत आलेले […]

Categories
कव्हर स्टोरी

रानटी जातीव्यवस्थेने घेतला आणखी एक बळी

जून – २०१४

खर्डाच्या घटनेमुळे परत एकदा अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाचे काळीज चिरून टाकणारी हे कथानक आहे. तरुण कोवळ्या वयातल्या दलित समाजातला एक निरागस युवक आपल्या शाळेतील तथाकथित उच्चवर्णीय कुटुंबातील मैत्रिणीशी बोलला, तर तिच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे हाल हाल करून त्याला मारून टाकले. जीवावर उदार होऊन त्याला शोधणार्‍या आई वडिलांना त्याचा देह एका […]

Categories
जात पंचायत

जातपंचायतीला मूठमाती….

जून – २०१४

खाप पंचायतींचे अमानुष निर्णय, आंतरजातीय विवाह केल्याची शिक्षा म्हणून केले जाणारे(डिस) ऑनर किलिंग हे सगळे कुठेतरी दूर, मागास भागात घडते आहे, असे आपल्याला वाटत असते. शहरात राहणार्‍या, मध्यमवर्गीय, शिक्षित माणसाला दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे खरेदेखील वाटले नसते की, माणसांचे मूलभूत हक्क हिरावून घेणार्‍या जातपंचायती महाराष्ट्रातही अस्तित्वात आहेत आणि त्यांची समाजजीवनावर पोलादी पकड आहे. गेल्या वर्षभरात जातपंचायतींच्या […]