जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि जातीच्या रक्षणासाठी जातबांधवांच्या आयुष्यावर जन्मापासून मरणापर्यत,नव्हे मरणानंतरही नियत्रण ठेवणारी जात पंचायत समूळ उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे. रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून वाढत्या संख्येने उजेडात येत असलेल्या जातपंचायत आणि गावकीच्या जुलुमांच्या आणि वाळीत प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरुद्ध चौथी परिषद 8 फ़ेब्रुवारी 2015 रोजी आयोजित केली […]